
ऋषीपंचमी हा एक हिंदु धर्मातील अत्यंत महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो.आणि हा सण, एक उत्सव म्हणुन साजरा न करता तो व्रत म्हणुन साजरा केला जातो.
ऋषीपंचमी हा दिवस साधु संताच्या सेवेचा दिवस मानला जातो .त्या दिवशी आपण सप्तऋषींंची पुजा करून झाल्यानंतर , सप्तऋषींंची कथा ऐकत असतो.आणि मग शेवटी ब्राम्हणनांना जेऊ घालुन त्यांना दक्षिणा देत असतो.
चला तर मग अजुन सविस्तरपणे जाणून घेऊ ऋषीपंचमी विषयी माहिती.
ऋषीपंचमी का साजरी केली जाते?
आजच्या ह्या कलियुगात पाप करण्याचे प्रमाण खूप वाढत चालले आहे.आणि आपल्या हातुन देखील नकळतपणे खुप पाप घडत असतात.आणि आपण केलेल्या ह्या सर्व पापांपासुन आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते.याचे प्रायश्चित आपल्याला करायचे असते.
ह्याचसाठी आपण ऋषीपंचमी च्या दिवशी सप्तऋषींंची पुजा करतो. त्यांची भक्तिभावाने/ मनापासुन सेवा देखील करत करतो. जेणेकरून आपण केलेल्या पापांपासुन मुक्ती मिळत असते.
त्याचबरोबर ऋषीपंचमी हा दिवस आपल्या मनातील भाव तसेच भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात असतो.
ऋषीपंचमीच्या व्रताचे महत्व काय आहे?
कोणताही पुरूष तसेच स्त्रीकडुन नकळतपणे आपल्या हातुन घडलेल्या चुका,पापांपासुन मुक्ती मिळवण्यासाठी ऋषीपंचमी चा व्रत करतात .
आणि ह्या दिवशी जर आपण सप्तऋषींची पुजा केली व त्याची सेवा केली तर आपल्या सर्व पापांपासुन मुक्ती मिळते असं म्हणतात .
आणि ह्या दिवशी जर आपण पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली अडकलेली सर्व कामे पुर्ण होतात .
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा