
आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत आणतात. त्यावेळी घरात येताना ताटाचमच्याने किंवा घंटा वाजवत घरात आणल्या जातात . यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, स्वयंपाक घराची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना देखील करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची मूर्ती बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात .नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी आकर्षित सजवतात .पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत आहे , काही भागात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे.या पारंपरिक प्रथेला गौरी आवाहन असे ही म्हणतात.
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा