करंजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
खुसखुशीत अशी करंजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे –
- रवा = तीन वाटी, रवा बारीक असावा.
- मैदा = अर्धी वाटी
- साखर = एक किंवा दीड वाटी
- साजुक तुप मोहनसाठी = छोटी अर्धी वाटी
- किसलेले खोबरे = एक वाटी
- काजु, बदाम, किसमीस = छोटी अर्धी वाटी
- चारोळी = आवडीप्रमाणे
- वेलची पुड = दोन चमचे
- तुप तळणासाठी = आवश्यकते प्रमाणे
- दुध = साधारण तीन कप / आवश्यकते नुसार
करंजी बनविण्याची कृतीः
करंजी बनविण्यासाठी आपल्याला दोन कृत्या कराव्या लागतात ,एक म्हणजे करंजीची पाती बनवण्याची कृती आणि दूसरी म्हणजे करंजीत सारण भरण्या ची कृती. सर्वप्रथम आपण पाती बनविण्याची कृती पाहुयात . करंजी ची पाती बनविण्यासाठी रवा आणि मैदाचे योग्य प्रमाणात मिश्रण घेऊन ते मोहन टाकुन एकत्रित मिसळून घ्या . आणि दुस-या टप्प्यात करंजीमध्ये भरण्याचे उत्कृष्ठ आणि चविष्ठ सारण बनविणे .सर्वप्रथम आपण करंजीची पाती तयार करण्या साठीची कृती काय आहे ते पाहुया. एका परातीत 3 वाटी रवा घ्यावा. त्यात अर्धी वाटी मैदा टाकावा. बारीक रवा आणि मैदा घेतल्यामुळे हवा लागली तरी करंजी कडक होत नाही. त्यानंतर त्यात छोटी अर्धी वाटी साजुक तुप पातळ करून टाकावे. मोहनसाठी तुप टाकल्यामुळे करंजीची पाती अगदी खुसखुशीत आणि खूप काळ मऊ राहते. त्यानंतर त्यात दुध टाकुन त्याचा घट्ट गोळा मळुन घ्यावा. तुप आणि दुध असल्यामुळे करंजीचे बाहय भाग अगदी मऊ राहतो, कडक होत नाही.
आता आपण पाहुया करंजीचे सारण कसे बनवायचे ? तर , करंजीचे सारण बनविण्यासाठी एक वाटी बारीक किसलेले खोबरे ( खोबरे खीस ) घ्यावे . त्यात अर्धी छोटी वाटी बारीक काजुचे काप, बदामाचे काप, किसमिस/ मणुका तसेच चारोळी टाकावी .२ चमचे बारीक केलेली वेलची पावडर घालावी ,अर्धी वाटी काजु, बदाम, मनूके घ्यावे 2 ते 3 चमचे चारोळी आणि १ ते १/५ वाटी आपल्या आवडीप्रमाणे पिठीसाखर घ्यावी.आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे, तयार झाले आपले पौष्टीक आणि चविष्ठ असे गोड करंजीचे सारण.
भिजत ठेवलेला रवा आणि मैदा चे मिश्रण तासभर भिजल्या नंतर, त्या मिश्रणाचे छोटे गोळे करून घ्या. ते मध्यम आकाराच्या जाडीचे आणि पुरी एवढया आकारात लाटावे. त्यात आपण बनविलेले करंजीसाठीचे सारण 1 चमचा भरावे आणि ती पाती अर्धगोल आकारात बोटभर अंतर ठेवुन कडा दाबुन बंद करावी लक्षात ठेवावे की ,पाती मध्ये भरलेले सारण तळताना बाहेर येणार नाही , यासाठी सारन भरल्या नंतर कडा पूर्ण बंद केल्या आहे कि नाही ह्यची खात्री करून घ्या.
भिजवलेल्या मिश्रणास एक तास भिजत ठेवावे. त्यामुळे मैदा आणि रवा सैलसर भिजतो आणि पाती मऊ व खुसखुशीत राहते .कडा दाबत असताना बेाटाला थोडे पाणी लावावे जेणे करून पाती च्या कडा पूर्ण चिटकतील आणि मधील भरलेले सारण तळतांना बाहेर येणार नाही.आता करंजीला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण वेगवेगळया प्रकारच्या मुरड ही पाडु शकतो किंवा करंजीच्या साच्यात देखील आकर्षक असा आकार ही देवु शकतो किंवा बाजारात जो कारंज्यांचा साचा चमचा भेटतो ,जो करंजीला झिकझॅक आकार देण्यासाठी वापरता येऊ शकतो. अशाप्रकारे सर्व करंज्या बनवुन घ्या. सगळ्या करंज्या तयार झाल्या की, एका खोलगट पॅनमध्ये किंवा कढई मध्ये करंज्या तळता येतील येवढे साजुक तुप/ किंवा तेल तळणासाठी कढई किंवा पॅन मध्ये टाका.
करंज्या तळत असताना अगदी हळूच आणि हळुवारपणे एक-एक करंजी टाकावी आणि सुरूवातीला मोठया गॅस वर आणि १/२ मिनिटांनतर मंद गॅस वर तळावी. करंजी अगदी लालसर होण्या आधीच बाहेर काढा, म्हणजे करंजीचा पांढराशुभ्र रंग आणि सुंदर असा आकार खाणा-यांचे नजरेत येईल ,सर्व करंज्या तळुन झाल्या कि टिश्युपेपर किंवा न्युपपेर वर टाकाव्यात , त्यामुळे जास्तीचे तुप किंवा तेल त्यावर निथळेल आणि आपली करंजी तूपगट किंवा तेलकट होणार नाही .(करंजी तळण्यासाठी आपण तेल देखील वापरू शकतो )
अशाप्रकारे आपली चवदार ,चविष्ठ आणि खुसखुशीत अश्या आपल्या करंज्या तयार होतील. सुके खोबरे वापरल्यामुळे ह्या करंज्या 10 ते 12 दिवस देखील आरामात ठिकतात. आणि त्याचा वास देखील येत नाही . जर आपण ओले नारळ कारंज्यात वापरले तर , जवळपास 3 ते 4 दिवसात त्या करंजीस कुम्मट वास येण्याची शक्यता असते . अशाप्रकारे वरील लेखाद्वारे आपल्याला करंजी कशी बनवायची / खुसखुशीत करंज्या कशा बनवायच्या हे नक्कीच समजले असेल .

selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
रव्याचा लाडू बनवण्यासाठी ची रेसिपी जाणुन घेण्या साठी येथे क्लिक करा