चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात ‘ध्यानी मणि, चिंतामणी’चा गजर करत येणाऱ्या भाविकांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. त्यांच्या आगमन सोहळ्याला मुंबईसह मुंबईबाहेरील शहरातील हजारो मंडळींनी हजेरी लावली होती.
हा ‘चिंतामणी’ शताब्दीकडे वाटचाल करत आहे. 1968-69 मध्ये गोल्ड फेस्टिव्हल, 1979-80 मध्ये डायमंड फेस्टिव्हल आणि 1994-95 मध्ये 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या चिंचपोकळी चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार कमी लोकांना माहीत आहे. 1920 च्या दशकात तरुणांना स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरणा मिळाली. समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य करण्यासाठी त्या वेळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली.
गणेशोत्सवाचे झाले उत्सव मंडळ
१९४४ साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे झाले. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये ‘चिंचपोकळी गणेशोत्सवह्या नावामध्ये बदल करून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नाव ठेवण्यात आले . गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील निश्चित काळसाठी असते पण मंडळाच्या समाजकार्याचा काळ निश्चित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नाव ठेवण्यात आले.
गणेशोत्सवात केवळ एकदाच वर्गणी गोळा करून वर्षभर समाजकार्य सुरू ठेवण्याची परंपरा उत्सव मंडळाने जपली आहे.
selfie with bappa स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा
लालबागचा राजा ची अधिक माहिती जाणून घ्या साठी यथे क्लिक करा